साहिल कबीर
ते- इतक्या पुस्तकांच काय
करतोस?
तो – सध्या जाळ करावा
म्हणतोय.
ते – म्हंजे विध्वंकस विद्वान
आहेस म्हनं की.
तो-थेंक्यु.विद्वान म्हंटल्याबद्दल
ते- तूला कायद्याने शिक्षा
दिली पाहिजे.
तो- म्हंजे कायदा जीवंतय!!
_____________
ते- थांबव गाडी. तपासू दे
तो- लायसन्स आहे की
ते- गाडीचा परवाना नको
तो- मग..
ते- कशाची ने-आण करतोस
ते पत्र दाखव.
तो- मी हिरवा भाजीपाला नेतोय
ते- मातेचा चारा चोरलास,
तो- वैरण नव्हे हे..
ते – वैर तर आहेच..
ते – पोपट आवडतो का
तो- त्याचा रंग आवडतो
ते- हा रंग जिहाद आहे
तो- तूमची सोच बाद आहे
ते- तूला निकाल याद आहे काय?
तो- निकालात ही वाद आहे.
ते-अपमान आहे भूमीचा
तो-नाही.
संविधानाच्या भूमिकेचा अपमान
आहे.
————————-,—————
ते- मातरम
तो- पाचेक वेळा डोकं टेकतो
ते- चालता हो, जा पाकात
तो-वसुदेव कुटुंबकम
ते-गाय सांभाळ माता आहे
तो- घरी तुकोबाची गाथा आहे
ते- देऊळ इथंच होईल
तो- हॉस्पिटल पण बांधा की.
ते- अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री
काय?
तो- मी घरी धर्म ठेवतो कोपऱ्यात
ते- मग रस्त्यावर कधी येता
तो-आलो की धर्मांध ठरवले जातो
ते- आम्ही खुप सहन करतो
तो-मी सगळे सण साजरे करतो.
ते-आरती म्हण, घालीन लोटांगण
तो- जनगणमन
ते- अधीनायक जय आहे
तो- भय हे भय हे भय हे
ते- घर वापसी कर
तो- सध्या बेघर आहे.
ते म्हणाले तो म्हणाला
ते म्हणत राहिले तो म्हणतं राहिला .
मी म्हणालो –
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
दोघे म्हणाले-
याला तोडा फाडा, याला मारा
————————————🔲
साहिल कबीर.
कवी कथाकार साहिल कबीर लिहीत आहेत दर सोमवारी…
आधीचे भाग वाचा…